रत्नागिरी : मंबई-गोवा महामार्गावर बसला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातातील २१ जणांची प्रकृती गंभीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे नजीकच्या आगवे वळणावर हा अपघात झाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने विशाल ट्रॅव्हल्सची बस निघाली होती. आगवे वळणावर आल्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी रस्त्यावर उलटली.  


या अपघातात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. सावर्डे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या डेरवण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सगळे प्रवासी मुंबईहून मालवणला जात असताना हा अपघात झाला आहे.