नवी मुंबई : ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि पनवेल दरम्यानची वाहतूक ठप्प आहे. ऐरोलीत रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक रखडली असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऐरोलीजवळ रुळाला तडा गेल्यामुळे मालगाडी अडकली आहे. यामुळे ठाण्याकडे येणारी आणि जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती नसल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झालाय.