रत्नागिरी :  आताची सर्वात मोठी बातमी आहे रत्नागिरीतून. रत्नागिरी - भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटीवरील दोन खलाशी बेपत्ता असून तीन खलाशाना वाचवण्यात यश आलं आहे. छोट्या बोटीने मासेमारी साठी ही बोट निघाली आहे.  या बोटीवर एकूण पाच जण असल्याची माहिती समोर आली आहे. तर भाट्ये सुमद्रात ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही.