मुंबई : पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसची भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १५ जखमी झाल्याचे वृत्त आहे.पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रक आणि  ट्रॅव्हल बस यांच्यात सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळ सकाळी हा अपघात झाला. अपघातातील ठार झालेले आणि जखमी प्रवाशी कर्नाटकातील असल्याचे सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरकडे निघालेला मालवाहतूक ट्रक आणि या ट्रकमागेच प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल बसही जात होती. दरम्यान, सातारा शहरानजीक असलेल्या खंडेवाडीजवळील उतारावर अचानक ट्रकचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाने ट्रक जागीच थांबवला. यावेळी भरधाव असलेली ट्रॅव्हल बस पाठीमागून ट्रकवर जोरात आदळली. 



या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर १५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर जखमींना जवळच्या शासकीय रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.