नागपूर : कळमेश्वर - सावनेर मार्गावर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. रिक्षाचा चेंदामेंदा झाल्याने या अपघातात रिक्षातील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांत तीन लहान मुले, एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हा अपघात दुपारी चार वाजताच्या सुमारास घडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहरम निमित्त नागपुरातील ताजबाग परिसरातील काही भाविक वरोडा शिवारातील चाँदशाह दर्ग्याकडे रिक्षाने जात होते. कळमेश्वर-सावनेर मार्गाववर वरोडा शिवारातील पोल्ट्री फार्मजवळ सावनेरकडून कळमेश्वरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली.


एका जखमींला नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाचही मृतकांचे मृतदेह कळमेश्वर येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातानंतर याठिकाणी सध्या तणावाचे वातावरण आहे.