औरंगाबाद : औरंगाबादमध्ये करमाड गावातल्या आठवडी बाजारात नियंत्रण सुटल्याने ट्रक घुसला. आणि या अपघातात 12 ते पंधरा जण जखमी झाले आहेत. त्यातल्या सात जणांची प्रकृती गंभीर आहे.


ट्रक रिक्षा आणि ट्रॅक्टरला धडकला


जखमी व्यक्तींवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. नियंत्रण सुटलेला हा ट्रक रिक्षा आणि ट्रॅक्टरला धडकला. त्यात रस्त्यावर बसलेले कापूस व्यापारी जखमी झाले आहेत. राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं आहे.