कल्याण : कल्याणमध्ये ५० लाखांच्या खंडणीसाठी दोन मित्रांनीच तिस-या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. 


गळा आवळून मयूरची हत्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयूर डोळसे असं यातील मृत तरुणाचं नावं असून तो कोळसेवाडीत राहत होता. मुळचा भुसावळचा असलेला मयूर नोकरीनिमित्त कल्याणमध्ये वास्तव्यास होता. त्याच्याच गावातले असलेले गोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत हे दोघेही कल्याणमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास होते. त्यांनी ८ नोव्हेंबरला मयूरला फोन करून जेवणासाठी बोलावलं. मात्र त्याच्या जेवणात झोपेचं औषधं टाकून त्याला झोप लागल्यानंतर त्याचा गळा आवळण्यात आला. 


५० लाखांची खंडणी


वास्तविक त्याचं अपहरण करून त्याच्या कुटुंबाकडून ५० लाखांची खंडणी मागण्याचा या दोघांचा डाव होता. पण त्याचा मृतदेह दुचाकीवर मध्ये बसवून आंबिवलीला नेला आणि झुडपात फेकून दिला. पोलिसांनी आरोपी गोकुळ आणि प्रमोदला अटक केली.