औरंगाबाद : पाडेगाव भागातील अन्सार कॉलनी या भागात चोर समजून नागरिकांनी दोन लोकांना बेदम मारहाण केली आहे. हे दोन लोक बहुरूपी असून भीक मागत होते. मात्र नागरिकांना त्यांचा संशय आला आणि त्यांनी या दोघांना काही प्रश्न विचारले.  मात्र ते समाधानकारक उत्तर न देऊ शकल्याने लोकांनी थेट मारहाण सुरु केली. शेकडो लोकांच्या जमावानं या दोघांना तब्बल अर्धा तास बेदम मारहाण केली. मात्र वेळेत पोलीस आले आणि त्यांनी यांची सुटका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रमजान महिना सुरु असल्याने, हे दोन संशयित भीक मागण्यासाठी आले असल्याची माहिती त्यांच्या चौकशीतून पुढं आली. गेल्या आठवडाभरात अशा मारहाणीच्या चार घटना औरंगाबादेत घडल्या आहेत, गेल्या आठवड्यात तर वैजापूर मध्ये अशाच मारहाणीत दोन लोकांचा मृत्यू झाला होता, लोकांनी अशी मारहाण करू नये, पोलिसांना या बाबतची माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येतंय.