मुंबई : नवी मुंबईत पादचारी पुलाचा भाग कोसळून दोन जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत हिमालय पादचारी पूल कोसळून ७ जण ठार झाले होते. तर ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. त्यानंतर मुंबईतील रेल्वे पूल आणि पादचारी पुलांचे ऑडिट पुन्हा करण्याचे आदेश राज्यशासनाने दिले होते. आता नवी मुंबईत वाशी येथील सागर विहार येथील पादचारी पुलाचा एक भाग कोसळला. या दुर्घटनेत दोन जण जखमी झालेत. ही घटना आज संध्याकाळच्या सुमारास घडली.