मिरज : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. उद्धव ठाकरेंनी बोरगाव, तासगाव येथील रोगग्रस्त द्राक्षबागांची पहाणी केली आणि येथील शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीतल्या मिरजमध्ये आयोजित जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि भाजप सरकारवर शेतकरी कर्जमाफी, वीजप्रश्न या मुद्यांवरुन निशाणा साधला. 


अनिकेत कोथळे हत्या प्रकरणावरुनही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी सत्तेचा मोह या शरद पवारांच्या विधानाचा समाचार घेताना, शरद पवारांनी स्वतः वसंतदादा पाटलांचा विश्वासघात केल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.