Vasai Crime News : महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक घटना वसईत घडली आहे. भर रस्त्यात तरुणीचा विनभंग करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला 24 तासात अटक केली आहे. पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई रेल्वे स्थानकातून मध्यरात्री कामावरून घरी परतणार्‍या 32 वर्षीय तरुणीचा एकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा जलद तपास करून 24 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे.


पीडित तरुणी सनदी लेखापाल ती असून वसईच्या स्टेशन परीसरात राहणारी आहे. स्टेशन पासून घर जवळ असल्याने ती नेहमीप्रमाणे रात्री उशीरा वसई रोड रेल्वे स्थानकातून घरी चालत जात होती याच दरम्यान, आरोपीने तुंगारेश्वर गल्लीतून ती चालत जात असताना आरोपीने तिला अडवले आणि तिचे तोंड दाबून तिला खाली पाडून तिचा विनयभंग केला. त्यानंतर या तरुणीचा महागडा फोन घेऊन पळ काढला. खाली पडल्याने तिला दुखापत झाली होती


या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळताच विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढण्यात आला. नालासोपारा येथून संदीप खोत (35) या आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्यावर मुंबईत फसणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे,


भाईंदर रेल्वे स्थानकात पिता पुत्राची आत्महत्या 


भाईंदर रेल्वे स्थानकात पिता पुत्राने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  सोमवारी सकाळी  10.30 च्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्म क्रमांक 6 वर ही घटना घडली आहे. भाईंदर स्थानकात प्लेटफॉर्म क्रमांक 6 वरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन खाली उडी मारुन दोघांनी आपले जीवन संपवले आहे हे दोघेही पिता पुत्र वसई मध्ये राहणारे आहेत. हरिश मेहता (वय 60 वर्षे) आणि मुलगा जय मेहता (वय 35 वर्षे) अशी यांची नावे असल्याची माहिती मिळत आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.  आत्महत्या का केली यांचे कारण समजू शकलेले नाही. वसई रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.