पालघर : विरारमध्ये चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गरम पाण्यात पडल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. मृत मुलीचे नाव अवनी सोनवणे असे आहे. या मुलीचे वय अवघे दीड वर्ष इतके होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरारमधील कोपरी भागात ही घटना घडली आहे. हे गरम पाणी अंघोळीसाठी ठेवण्यात आले होते. अवनीची आई कचरा टाकण्यासाठी घराबाहेर गेली होती. या दरम्यान घरात कोणीही नसल्याने सर्व घटना घडली. यानंतर अवनीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  


पालकांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना दररोज घडत आहे. कालच औरंगाबादमध्ये ३ वर्षाचा मुलगा गरम भाजीवर पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 


औरंगाबादच्या चिखलठाना भागातील पुष्पक गार्डन परिसरात ही घटना घडली होती. हर्षल संतोष गाधु या चिमुकल्याचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. हर्षल खेळत असताना त्याला चक्कर येऊन तो भाजीत पडला होता. ज्यामुळे त्याचं डोकं. चेहरा भाजला होता.