मुंबई : Rain in Maharashtra :राज्यात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आठवडापूर्वी संततधार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी यवतमाळ जिल्ह्यातील 11 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 26 अशी 38 गावे पुराने वेढली होती. यवतमाळच्या वणी तालुक्यातील तीन गावांची स्थिती गंभीर होती. यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अतिवृष्टी झाली होती होती.


पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. तर विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणचा पूर ओसरला असला, पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने वणीतील भुरकी, रांगना आणि सेलू खुर्द या गावांत पुन्हा पूरस्थितीची भीती व्यक्त होत आहे. 


या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस


चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. विदर्भातील वाशिम, अकोला, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये चंद्रपूरमध्ये अनेक ठिकाणी, गडचिरोली, यवतमाळमध्ये काही ठिकाणी, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.