नितेश महाजन, झी मीडिया, जालना : घराच्या भिंतीत करंट उतरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील हिवरा राळा गावात घडलीय.रामकोर खडेकर अस मृत महिलेचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत महावितरण च्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केलीय.



गावातील डीपीला आर्थींग नसल्यानं गावातील भिंतीत करंट येत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. पण या प्रकाराकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्यानं महिलेचा नाहक बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.