मुंबई : संभाजी भिडेंच्या अटकेच्या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणा-या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पण पोलिसांचा आदेश नाकारून एल्गार मोर्चासाठी कार्यकर्ते सीएसएमटी स्टेशनवर जमा व्हायला सुरूवात झालीय. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले.सीएसएमटीवर हा गोंधळ पाहायला मिळाल्याने वातावरण तणावाचे पाहायला मिळाले.


सरकार जबाबदार- आंबेडकर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी केवळ आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र मोर्चा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मांडलीय.  गोंधळ झाल्यास सरकार जबाबदार असल्याचेही ते म्हणाले. 


आज भायखळा ते आझाद मैदान मोर्चा निघणारच असा निर्धार आंबेडकरांनी व्यक्त केलाय. मात्र मोर्चा दरम्यान गोंधळ निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार असल्याचंही आंबेडकरांनी नमूद केलंय. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी एकबोटेंपाठोपाठ संभाजी भिडेंनाही अटक करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.


आठवलेंची मागणी


भीमा कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची मागणी रास्त असून संभाजी भिडे गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली.