ठाणे : मंगळवारी झालेल्या पावसाने अनेकांची दाणादाण उडवून दिली. परंतु, हा पाऊस काहींच्या जीवावर बेतला. यातील बळींची संख्या हळूहळू समोर येऊ लागली आणि हे प्रसंग ऐकून तुम्ही आम्ही सगळेच चिंतेत पडलो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरम मॉलच्या शेजारी असलेल्या संभाजी नगर या भागातील गौरी जयस्वाल ही १३ वर्षांची मुलगीही वाहून गेली होती, या मुलीचा मृतदेहही कळवा खाडीत सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाण्यातून वाहून गेलेल्या एकूण ८ पैकी ७ जणांचे मृतदेह सापडले असून अजय उर्फ मिनू आठवाल हा अजून बेपत्ता आहे. त्याचा शोध महापालिकेच्या ४० कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. 


अजय हा त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या ९ वर्षांच्या मुलीला वाचविण्यासाठी गेला होता. परंतु, अजय हादेखील पाण्यातच वाहून गेला आहे. त्याचा शोध लवकरात लवकर घेण्यात यावा यासाठी बुधवारी काही लोकांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते.