मुंबई : लोकलमधून प्रवास करताना सोमवारी १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे तर ८ जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या लोकांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईद असल्यामुळे सोमवारी लोकल ट्रेनला गर्दी होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना गर्दीचा त्रास करावा लागत होता.


रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई आणि वाशी येथे ३-३, वडाळा रोड आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. डोंबिवली, ठाणे, बोरिवली, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एका प्रवाशाचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर २५ जून रोजी देखील लोकल अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता.