मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड 19 संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४,३०,६७० पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५,६५,७२६ व्यक्तींना कॉरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात लॉकडाऊनच्या काळात कलम १८८ नुसार १,१५,२६३ गुन्ह्यांची नोंद झाली असून २३,२०४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ४८ लाख ६२ हजार ९४७ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


कोरोनाचा सामना करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या असून यामध्ये ८३० व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


लाँकडाऊनच्या काळात 100 या क्रमांकावर ९५,९११ फोन आले. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६९५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,६५,७२६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.


या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ७२,६८७ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ११ पोलीस व १ अधिकारी असे एकूण १२, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण २, ए.टी.एस.१, ठाणे ग्रामीण १ अशा २० पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. 


राज्यात एकूण १२३१ रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास ७६,२१३ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे. असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.