मुंबई : मुंबई-ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवावर यंदा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं सावट पाहायला मिळालं. दरवर्षी मोठ्या सिनेकलाकारांच्या उपस्थितीत मोठ्या धामधुमीत होणारा हा उत्सव यंदा साधेपणानं साजरा कऱण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. मुंबईतल्या विविध ठिकाणी ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. तीन जखमी गोविंदांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 


तर दुसरीकडे ठाण्यातल्या दहीहंडी उत्सवात पुन्हा नऊ थरांच्या विक्रमाची बरोबरी केलीय. यंदाही जय जवान गोविंदा पथकानं हा विक्रम नोंदवला आहे.