मुंबई : आज राज्यात कोरोनाचे ८३६९ नवे रूग्ण वाढले असून २४६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ७१८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १,८२,२१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.७२% वर पोहोचले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७५ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६,४०,६४४ चाचण्यांपैकी ३,२७,०३१ (१९.९३ टक्के) नमने पॉझिटिव्ह आले आहेत.


सध्या राज्यात ७,७९,६७६ व्यक्ती होम क्वारंटाईन असून ४५,०७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.



- रायगडमध्ये आज दिवसभरात तब्बल 299 नवीन रुग्ण वाढले. 


- जळगावात आज दिवसभरात 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून जळगाव जिल्ह्यात 183 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.


- परभणीत आज कोरोनाचे 26 नवे रुग्ण आढळले आहेत.


- अमरावती जिल्ह्यात सकाळ पासून 54 नवीन रूग्ण आढळले आहेत.


- वसई-विरार मध्ये दिवसभरात १६९ नवे रुग्ण आढळले आहेत. 


- आज दिवसभरात उल्हासनगर- 100, बदलापूर- 58, अंबरनाथ- 39 नवे रुग्ण आढळले आहेत.


- ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाचे 187 नवे रुग्ण वाढले आहेत.


- नवी मुंबईत आज 254 रुग्ण वाढले आढळले.


- कल्याण-डोंबिवलीत क्षेत्रात आज 268 रुग्णांची नोंद झाली आहे.