मुंबई : शनिवारपासून होत असलेल्या पावसामुळे विक्रोळी आणि चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विक्रोळी सुर्यनगर परिसरामध्ये तीन ते चार घरांवर दरड कोसळली आहे .आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरूषाचा समावेश. अद्यापही या ठिकाणी आठ जण अडकले असल्यामुळे बचाव कार्य सुरू आहे.  घरांवर दरड कोसळल्यामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे, रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर भागात मोठी दुर्घटना घडलीये. पावसामुळे चेंबूरच्या भारत नगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली आहे. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. आतापर्यंत ढिका-याखालून 13 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे. 



अजूनही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.. जखमींना राजावाडी तसंच जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलंय.. बजावकार्यासाठी NDRFची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे.