मुंबई : पुढच्या महिन्यात गणपतीचे आगमन होत आहे. गणेशोत्सवासाठी सर्वांचीच तयारी सुरु झाली. कोकण रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळलाय. अनेक गाड्यांचे बुकींग फुल्ल झालेत. आता एसटी महामंडळाने गणेशभक्तांसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळ गणेशभक्तांसाठी यंदाही जादा गाड्या सोडणार आहे. यासाठी २५ जुलैपासून आरक्षण सुरू केलं जाणारय. २५ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. कोकणातल्या गणेशभक्तांसाठी यंदा 3 हजार 915 फेऱ्या सोडल्या जाणार आहेत.


 गणेशोत्सवासाठी मुंबई पुण्यातला चाकरमानी कोकणात जात असतो. एखाद्या भागातल्या प्रवाशांकडून ग्रुप आरक्षणावर जास्त भर दिला जातोय. त्यामुळे त्याचीही सोय एसटीने केली आहे.