मुंबई : मुंबई विद्यापीठात रखडलेले सर्व निकाल येत्या 5 ऑगस्टला लागतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकनाबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.


ऑनलाईन मुल्यांकनाची पद्धत योग्यच आहे. पण अंमलबजावणीची पुरेशी तयारी न झाल्यानं सगळा घोळ झाला. येत्या काळात ही पद्धत रुजवून पुढच्या वर्षी असे घोळ टाळण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शिवाय परदेशी जाऊ इच्छिणा-यांनाही काही अडचण असल्यास सरकार सहाय्यता करेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.