France Indian Plane Human Trafficking Controversy : मंगळवारी मुंबई विमानतळावर वेगळच थरारनाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सनं रोखलेलं विमान तब्बल 4 दिवसांनंतर मंगळवारी मुंबईत परतलं. 25 डिसेंबरला या विमानाचं पॅरिसच्या वाट्री विमानतळातून उड्डाण धालं आणि मंगळवारी पहाटे 4 वाजता ते मुंबईच्या धावपट्टीवर लँड झालं. PTI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार या विमानातून 276 प्रवासी मुंबईत आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विमानतळावर पोहोचताच या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सीआयएसएफनं चौकशीसुद्धा केली. काही प्रवाशांना माध्यमांच्या प्रतिनिधींना गाठलं आणि त्यांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. पण, हे सर्व पाहून प्रवाशांना मात्र तिथून पळ काढला, आणि ते सर्वांच्या नजरा वळवून गेले. उपलब्ध माहितीनुसार हे प्रवासी पंजाब, गुजरात आणि दक्षिण भारतातील असल्याचं कळत आहे. 


सोमवारी दुपारी हे विमान भारतात येणं अपेक्षित होतं. पण, यामधील काही प्रवाशांनी भारतात येण्यास नकार देत फ्रान्समध्येच शरण मागितली होती. ज्यामुळं प्रकरण चिघळलं आणि भारताच्या दिशेनं होणारं उड्डाण टळलं. 22 डिसेंबरला फ्रान्समधील विमानतळावर इंधन भरण्यासाठी हे विमान पोहोचताच तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती मिळाली. 


हेसुद्धा पाहा : TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले 'या' शेअर्समधील पैसे


या विमानातून मानवी तस्करी करत काहीजणांना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकामी नेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि तातडीनं या विमानाचं उड्डाण रोखण्यात आलं. ज्यानंतर या प्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली होती. 


फ्रान्समध्ये काय घडलं? 


सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार या विमानातून 300 प्रवासी भारतात येत होते. या प्रवाशांपैकी 25 भारतीयांनी फ्रान्समध्येच शरणागती मागितली असून, ‘चार्ल्स द गॉल’ विमानतळावरील त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं जिथं शरण मागणाऱ्यांना पाठवलं जातं. 


फ्रान्सच्या पोलिसांनी कालांतरानं त्या दोघांचीही सुटका केली. सदरील प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार भारतीयांना मध्य अमेरिकेतील एखाद्या ठिकाणी आणलं जात होतं असा संशय यंत्रणांना आला होता. यापैकी काहीजणांना कॅनडा गाठायचं होतं असाही संशय होता.