मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या सरकारी बंगल्यावर, रात्री भाजप नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत, राज्यातल्या शेतकरी आंदोलनाचा साधा विषयही निघाला नाही. भाजपच्या मंत्र्यांनी नुकतीच राज्यभरात शिवार संवाद यात्रा आयोजित केली होती. या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद याच मुद्द्यावर वर्षावरच्या बैठकीत चर्चा झाली. 


सोबतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा १६ जूनपासून ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर असणार आहेत. त्या कार्यक्रमाचा विषयही या बैठकीत मांडला गेला. मात्र राज्यभरातल्या शेतकरी संपाबाबत काहीच चर्चा झाली नाही.