मुंबई : मुंबईवर पावसाचे ढग अजूनही कायम आहेत. त्यामुळं पुढच्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्य़ांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.


अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तसंच अत्यावश्यवक सेवा आणि त्यासंबंधीत सरकारी कर्मचारी कामावर असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर उद्या अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईतल्या सरकारी कर्मचा-यांना सुट्टी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. मुख्य सचिवांच्या कार्यालयानं यासंदर्भात पत्रक जारी केलं आहे.