मुंबई : या पुढे निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातले पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबईत होतेय. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं. शिवसेना सोबत असेल किंवा नसेल तरी निवडणुकीच्या तयारीला लागण्याची सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. मात्र शिवसेना सोबत आली नाही तर निवडणूक जिंकणं अवघड आहे, ही धारणा पालघरनं खोटी ठरवल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या बैठकीत विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे.