ठाणे : कल्याण, डोंबिवली, बदलापूर, कर्जत परिसरता सकाळपासून मुसळधार सुरूच आहे. काल रात्रभरात बदलापुरात 238 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर अंबरनाथमध्ये १७५ मिलीमीटर पाऊस पडला आहे


गोरेगाव, कुभार्ली भागालाही पावसानं झोडपून काढलं आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवलीमध्येही रात्रभर तूफान पाऊस झाला. आज सकाळीही पावसाचा जोर कायम असल्यानं या परिसरातून मुंबईला कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी घरीच थांबणं पसंत केलं आहे.