मुंबई : भिमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्या काही दलित संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबईत ही बंदची हाक दिली गेली आहे. या बंद मुळे वहातुकीवर परिणाम होतो. जागो जागी वाबतूक खोळंबून पडते. यामुळे डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम होतो. जर जेवणाचे डबे वेळेवर कार्यालयात पोचले नाहीत तर त्याचा उपयोग ही होत नाही.


म्हणून उद्या मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव येथील जी घटना घडली त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा असे आवाहन मुंबईचे डबेवाले करत आहे,अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली आहे. 


मुंबईत स्कूल बस बंद


दरम्यान, मुंबईतही उद्या स्कूल बस न चालवण्याचा निर्णय काही संघटनांनी घेतल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस चालक संघटनेने हा निर्णय घेतलाय. दर औरंगाबादमधील डॉ. आंबेडकर विद्यापीठाचे उद्याचे पेपर पुढे ढकलले आहेत.


औरंगाबादमध्ये शाळा बंद


तसेच औरंगाबादमध्ये तणावाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय शाळा प्रशासनाने घेतल्याची माहिती देण्यात आलेय. तसेच पुण्यातही भीमा कोरेगाव पडसादानंतर उद्या होणारे पेपर पुढे ढकल्याची माहिती पुणे विद्यापीठाने दिलेय.