मुंबई : कळंब बीच येथे होळी साजरा करण्यासाठी गेलेल्या ५ जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. बुडालेल्यांना स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दरम्यान, एक मृतदेह हाती लागला असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असून अग्निशमन दलाचे जवान बेपत्ता झालेल्यांचा शोध घेत आहेत. त्यांच्या हाती एक मृतदेह लागला असून इतर चार जणांचा शोध घेतला जात आहे. होळी सणाच्या दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.


बुडून मृत्यू झाल्यांची नावे -


निशा कमलेश मौर्य (३६), 
प्रशांत कमलेश मौर्य (१७), 
प्रिया कमलेश मौर्य (१९, सर्व रा. ०७, २०२ गोकुल पार्क, मानव मंदिर स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड, वसई पश्चिम),
कांचन मुकेश गुप्ता (३५), 
शितल दिनेश गुप्ता (३२, रा. १/१, गोकुल पार्क, मानव मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम)