मुंबई : पंतप्रधान कार्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पासंदर्भात मॅरेथॉन बैठक झाली. त्यात रायगड किल्ला विकासावर भर देण्यात आला. सिंचनाचे महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळणार आहे. तर सीआरझेडचे नियम शिथिल केल्यामुळे झोपडपट्टीत राहणा-या ८ लाख लोकांना घरे उपलब्ध होणार आहेत.