मुंबई : राज्यात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार आहे.. कुलाबा वेधशाळेन असा अंदाज वर्तवलाय.. येत्या 48 तासांमध्ये कोकण किनार पट्टी विशेषत उत्तर कोकणात रायगड, ठाणे पालघर जिल्हात अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळ कोकण आणि गोवात ही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत होता.. मात्र हवामान खात्यानं आता बळीराजाला दिलासा देणारा अंदाज वर्तवलाय.. 


वातावरणातील बदल अनुकूल नसल्यानं पावसानं दडी मारलीये.. अनेक भागात शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय.. मात्र हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर शेतक-यांना मोठा दिलासा मिळालाय..