मुंबई : तीन  दिवसांची सुट्टी संपवून पिकनिकवरून परतणा-या मुंबईकरांचे पुन्हा एकदा हाल सुरू आहेत. सायन पनवेल महामार्गावर संध्याकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही तेच चित्र दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या दिशेनं येणा-या हजारो वाहनांमुळं महामार्गावर वाहतूक कोंडी झालीय. कळंबोलीपासून कामोठ्यापर्यंत अत्यंत धीम्या गतीनं वाहतूक सुरू आहे. मुंबईत प्रवेश करतानाच्या सगळ्याच एन्ट्री पॉईंट्सवर अशा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यात.


शनिवार-रविवारच्या वीकेंडला जोडून नाताळची सुट्टी आल्यानं अनेकांनी मुंबईबाहेरचा रस्ता धरला होता. त्यावेळी त्यांना ट्रॅफिक जॅमला तोंड द्यावं लागलं. आणि आता मुंबईत परतताना देखील वाहतूक कोंडीचा त्रास सोसावा लागतोय. या ट्रॅफिक जॅममुळं सगळ्यांचेच हाल सुरू आहेत.