मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सात प्रश्न विचारले आहेत. सध्या काँग्रेस राहुल गांधी यांची लोकसभेत झालेली वापसी सेलिब्रेट करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यात व्यस्त आहे. तरी मला 2 वेळा माजी खासदार म्हणून त्यांचे आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचे लक्ष मूलभूत मुद्यांकडे वळवायचे आहे. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी 7 प्रश्न ट्विट केले आहेत. या 7 प्रश्नांच्या माध्यमातून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ट्विट द्वारे त्यांनी पुढील 7 प्रश्न राहुल गांधी यांना विचारले आहेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. दलित, आदिवासी, मुस्लीम आणि ओबीसींच्या खर्‍या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष कधी बोलणार? #ManipurCrisis आणि #ManipurViolence या दोन्हींबाबत तुमची प्रतिक्रिया अत्यंत उशीरा आणि राजकीय अचूकतेची (Political Correctness) अनुभूती देणारी होती


2. सरकारने लोकसभेत फूड डिलिव्हरी अॅपवरून ऑर्डर देण्यापेक्षा वेगाने पास केलेल्या कठोर #DataProtectionBill च्या चर्चेत तुम्ही भाग का घेतला नाही?


3. कॉँग्रेस लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या अलीकडील धोरणावर सरकारला कधी कोंडीत पकडणार आहे, जे थेट एका विशिष्ट उत्पादन उद्योगाला मदत करते, ज्यांचे शेअर्स बंदीनंतर वाढले आहेत? भारतातील भ्रष्टाचाराच्या बीजाबाबत - निवडणूक रोख्यांबाबत तुमची भूमिका काय आहे?


4. #ManipurCrisis वर तुमची आघाडी खरा प्रश्न कधी विचारणार आहे — हिंदू मैती यांना अनुसूचित जमाती (ST) चा दर्जा का दिला गेला? कोणत्या पक्षाने ही प्रक्रिया सुरू केली? या निर्णयावर तुमच्या आघाडीची काय भूमिका आहे?


5. मैला वाहून नेण्याची (manual scavenging) प्रथा संपुष्टात आली आहे, याचा दोन्ही सभागृहात वारंवार पुनरुच्चार करून सांगण्यात आलेल्या सरकारच्या आकडेवारीशी आणि उत्तराशी तुम्ही सहमत आहात का?


6. एससी उपयोजना आणि एसटी उपयोजना (SCSP आणि TSP) निधी हमी योजनांसाठी वळवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल?


7. माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे नियमितपणे हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्या बागेश्वर बाबाचा पाहुणचार करत असतील (Hosting Bageshwar Baba) तर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आहे?


या प्रश्नांना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे


दरम्यान राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधी यांना, ''प्रिय राहुल गांधी, तुमचा आवाज बंद करण्यात आला होता, पण याकाळात संपूर्ण काँग्रेस आणि आघडीचाही आवाज बंद करण्यात आला होता का?'' असाही सवाल विचारला आहे


ट्विटच्या शेवटी '' जवाब देना पडेगा'' असं म्हणत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना या प्रश्नांकडे नेहमी प्रमाणे दुर्लक्ष करता येणार नाही असेही बजावल्याचे दिसून येते.