मुंबई  : सुपरफास्ट आणि अत्याधुनिक मुंबई-करमळी तेजस एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करमळी येथून गुरुवारपासून गाडी क्रमांक २२१२० तेजस एक्स्प्रेस सकाळी ९ वाजता सुटेल ती मुंबईत १९.४५ वाजता पोहोचणार आहे. यापूर्वी करमळी येथून ७.३० वाजता करमळी-मुंबई अशी गाडी सोडण्यात येत होती.


पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तेजसच्या केवळ वेळेत बदल करण्यात आला आहे. मात्र एक्स्प्रेसच्या थांब्यात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत.



आठवड्याच्या दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी ती धावणार आहे. मान्सून काळात तेजस एक्स्प्रेस केवळ तीन दिवस धावणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेच्या अन्य गाड्यांच्या वेळेत मान्सूननुसार बदल करण्यात आलाय. त्यामुळे मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या एकतास आधी धावत आहेत.