मुंबई : Maharashtra Political Crisis Latest Updates: शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईत परतणार आहेत. दरम्यान, विमानतळावर त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाजपकडून या आमदारांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीपासून यात भाजपची भूमिका राहिली आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून बंडखोर आमदारांना भाजप राज्यात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासोबत भाजपचे काही पदाधिकारी 24 तास आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना बंडखोर आमदार आज मुंबईत येणार आहेत. उद्या विधिमंडळाचं विशेष अधिवेशन होत आहे. (Maharashtra Politics) त्यामुळे सर्व आमदार आज गोव्याहून मुंबईत येतील. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गोव्यात दाखल झालेत. पहाटे चार वाजता ते गोव्यात दाखल झाले. आज सर्व आमदार गोव्याहून मुख्यमंत्र्यांसह मुंबईत परतणार आहेत.  


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच एकनाथ शिंदे सक्रिय दिसत आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्त्वपूर्ण बैठकही घेतली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षविरोधी कारवायांचा आरोप करुन त्यांनी शिंदे यांना सर्व पदांवरुन हटवले आणि शिंदे यांना शिवसैनिक म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. 


महाराष्ट्रातील राजकीय खलबते थांबताना दिसत आहेत. आज दुपारी दोन वाजेपर्यंत सभापती पदासाठी अर्ज भरण्याची मुदत आहे. भाजपने आपल्यावतीने राहुल नार्वेकर यांचे नाव दिले असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीने अद्याप नाव दिलेले नाही. त्यांनी तसे न केल्यास राहुल नार्वेकर बिनविरोध निवडून येतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे, मात्र शिवसेना इतक्या सहजतेने ही निवडून होऊ देणार नाही. हार मानणार नाही आणि आज एक सरप्राईज देण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांना सर्व पदांवरून हटवले आहे.