COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई :  मालाड पूर्वेतील पिपंरी पाडा याठिकाणी मुसळधार पावसामुळे १५ ते २० फुट उंच भिंत कोसळल्या परिसरात खळबळ माजली आहे. मध्यरात्री 10 ते 12 घरांवर कोसळल्यामुळे 12 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. यामध्ये जवळपास 30 ते 40 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.


जखमी रुग्णालयात 



मुसळधार पावसामुळे आरसीसी भिंत कोसळण्याची घटना घडली. तत्काळ स्थानिक नागरिकांनी पीडित नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. मालाड मधील गोविंद नगर हॉस्पिटल, सिद्धार्थ हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रॉमा रुग्णालयात ५ जणांचा मृत्यु जाल्याचे समोर येत आहे.