प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : २५ लाखांच्या खंडणीसाठी १३ वर्षीय मुलाचे अपहण करुन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना मीरा रोडमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत मुलाच्या मित्रांनीच पैशांसाठी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी अफझल अन्सारी (२२) आणि इम्रान शेख (२४) या दोन आरोपींना अटक केली आहे.


मृत मुलाची आई ही बोरिवलीच्या एका बार मध्ये गायिका म्हणून काम करते. त्यामुळे तिच्याकडे भरपूर पैसे असतील असे आरोपींना वाटले होते. त्यामुळे पैशांच्या आमिषाने त्यांनी मुलाचे अपहरण करून खंडणीचा बनाव रचला होता. 


दरम्यान, मुलाला संशय आल्याने आरोपीनी त्याची चाकू भोसकून हत्या केली व त्याचा मृतदेह वालीव पोलीस ठाणे हद्दीत फेकून दिला. नंतर त्याच्याच फोनने खंडणी मागितली. पोलिसांनी अधिक तपास करत आरोपींना अटक केली आहे.