मुंबई : एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ मनसेने रेल्वे मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप सरकारने अच्छे दिन म्हणत नागरिकांना फसवलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी अनेक भाषणं केली आणि सत्तेत आल्यानंतर वेगळं बोलत आहेत. मोदींनी पंतप्रधान बनण्यापूर्वी पेट्रोल संदर्भात केलेल्या भाषणांची क्लिप सध्या व्हायरल होत आहे. इतका खोटा बोलणारा पंतप्रधान मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये असेही राज ठाकरेंनी म्हटलं.


भाजप सरकार काहीच करु शकत नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफीही देणार नाही. हे सर्व भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही माहिती आहे. सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेलं 'विकास वेडा झाला आहे' हे सुद्धा भाजपचंच स्लोगन असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.