मुंबई : आज पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे ह्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला त्याब्यात घेतले आणि अनर्थ टळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कारंडे ह्या उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावच्या रहिवाशी आहेत. सावकारपासून होणाऱ्या  त्रासबद्दल याआधी पत्र लिहून मदत करण्याची विनंती अलकाबाई कारंडे यांनी केली होती. मात्र सरकारकडून दाद न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.