मुंबई: लक्षावधी मुंबईकरांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मध्य रेल्वेची सेवा आज (२४ जुलै) कोलमडली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. यातून महिला, विद्यार्ती, सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायीकही सुटले नाहीत. सर्वांनाच रेल्वेच्या मंदगतीचा फटका बसताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


..तर वेळेत निघा


घाटकोपर आणि कुर्ला  दरम्यान तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे धीम्या मार्गावरची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आलीय.. वेळापत्राचे तीन तेरा वाजले आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहतूकीचा बोऱ्या वाजल्यानं कामावर निघालेल्या सगळ्यांनाच ऑफिसात पोहचायला उशीर होतोय. त्यामुळे तुम्हाला कामावर वेळेवर पोहोचायचे असेल तर आज लवकरच निघा..