दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष अखेर बदलणार आहे, अशी विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे. संजय निरुपम यांचे मुंबई काँग्रेस अध्यक्षपद जाणार असल्याचं काँग्रेसमधील सुत्रांनी म्हटलं आहे. संजय निरूपम यांच्यानंतर, अध्यक्षपदासाठी आमदार भाई जगताप आणि कृपाशंकर सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये बदल केले जाणार आहेत. सर्व समावेशक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा अध्यक्ष हवा असल्याचं म्हटलं जात आहे, त्यासाठी भाई जगताप यांचं नाव आघाडीवर असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय निरुपम यांच्याबद्दल मुंबई काँग्रेसमध्ये काहीशी नाराजी आहे. काँग्रेसमधील एक गट निरुपम यांच्यावर नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. आज रात्री दिल्लीत राहुल गांधी यांच्याकडे होणार्‍या बैठकीत याबाबत चर्चा होणार असल्याचं, काँग्रेसमधील सुत्रांनी म्हटलं आहे.