मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंग हॅन्डलिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे घेतलंय. कामगार आयुक्तांपुढे झालेल्या बैठकीत भारतीय कामगार सेना आणि एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट कंपनी व्यवस्थापनात यशस्वी तोडगा निघाला. कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि वेतनवाढ तसेच अन्य सुविधांच्या मागण्या व्यवस्थापनाकडून मान्य झाल्या असून व्यवस्थापनानं तसं लेखी दिलं. त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलं.


काय होत्या तक्रारी आणि मागण्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 - व्यवस्थापनाद्वारे होणारी सततची त्रासदायक व अपमानास्पद वागणूक


- वर्षानुवर्षे रखडलेली पगारवाढ


- बोनस दिला जात नाही


- वाहतूक सुविधा दिली जात नाही


- महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन


- अवैध पद्धतीने कामगारांना कामावरुन काढून टाकणे


- नवीन नियुक्ती न करता निवृत्त झालेल्याच कामगारांना पुन्हा कामावर घेतले जाते