मुंबई : रेल्वे प्रवासादरम्यान ओळख झालेल्या महिलेला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाला घरात डांबून ठेवले. त्यांनतर काप फोडल्याच्या शुल्लक कारणावरून त्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आठ दिवसांपूर्वी घाटकोपर येथे घडली. राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसात खबर केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून नितीन पठारे (३६) या आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिला मूळची नाशिकची असून ती दोन मुलांसह पतीपासून वेगळी झाली आहे. दीड महिन्यांपूर्वी तिची ओळख घाटकोपर येथे राहणाऱ्या नितीन पठारे यांच्याशी झाली. त्यांच्यात थोडी मैत्री झाल्यानंतर ती पती नांदवत नसल्याचे तिने आरोपीला सांगितले. माझा भाऊ वकील असून तो तुला न्याय मिळवून देईल, असे सांगून त्याने तिला मुंबईत बोलावले. मात्र मुंबईत आल्यानंतर त्याने महिलेला आणि तिच्या दोन मुलांना घरात डांबून ठेवले. एका दिवस महिला घरात नसताना तिच्या ३ वर्षांच्या मुलाच्या हातून चहाचा कप खाली पडला आणि या कारणावरून आरोपीने मुलाची गाला दाबून हत्या केली. 


आरोपीने या मुलाचा मृतदेह कल्याण येथील हाजी मलंग येथे दफन केला. महिलेच्या पाच वर्षाच्या मुलीने ही भावाच्या हत्येची बातमी आपल्या आईला दिली. याबद्दल आरोपीकडे विचारणा केली असता आरोपीने महिलेला जबर मारहाण केली. याचदरम्यान धक्का देऊन पळून जाण्यास तिला यश आले. त्यासाठी तिने शेजारच्यांनी मदत घेतली. शेजारच्यांनी ही बाब पोलिसांनी सांगितली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या दोघी माय लेकींनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार येथील एका डॉक्टरला सांगितला. डॉक्टरने तात्काळ ही माहिती पंतनगर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.