मुंबई : सरकारने कर्जमाफीच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभं रहावं, अशी अपेक्षा अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे. नानाच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाचं घरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. 


गणेशोत्सवातील हे दिवस भारावणारे असतात. मात्र त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून हा सण निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं. मुंबईतल्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतही नानानी मार्मिक टिपण्णी केली.