मुंबई : दिल्लीतील निर्भयासारखी धक्कादायक घटना काल रात्री मुंबईत घडली. याबाबत संताप व्यक्त होत आहे (Mumbai Nirbhaya case) . मुंबई शहरातील साकीनाका भागात महिलेवर बलात्कार (Women Rape) करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची (Women) प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान या महिलेनं अखेरचा श्वास घेतला. (Mumbai woman raped inside tempo)


"अशा नराधमांना फाशीच झाली पाहिजे"-  देवेंद्र फडणवीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या प्रकरणावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे. फडणवीस म्हणाली अशा नराधमांना तर फाशीच व्हायला पाहिजे. इतकी मोठी घटना मुंबईसारख्या वरदळीच्या ठिकाणी घडली. आपलं पोलीस खातं काय करतय हे पाहाण्याची गरज आहे.


या सगळ्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शक्ती कायदा लागू करायला हवा, परंतु त्यावर सरकारकडून फक्त बैठकाच सुरू आहे. त्यात महिला आयोगाला अध्यक्ष देण्यासाठी ही सरकारला वेळ नाही. महाराष्ट्रासारख्या राज्याला हे शोभणारे नाही. असे पुढे फडणवीस म्हणाले.



काय घडलं?


महिलेवर बलात्कार करून त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी सारखी वस्तू घुसवून तिला गंभीर जखमी केले होते. सकिनाका खैरनी रोड येथील एका स्टुडिओजवळ एका टेम्पोत हा सर्व प्रकार घडला होता. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार घडला.


रात्री तीन वाजताच्या दरम्यान पोलीस कंट्रोल रुमला फोन आला. एका महिलेला कोणीतरी मारत आहे आणि ती गंभीर जखमी आहे. अशी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.


दरम्यान, अत्याचार करण्याला पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टरांनी या महिलेची तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. तिच्यावर उपचार सुरु होता. दरम्यान राजावाडी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या पीडितेचा मृत्यू झाला आहे.