दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरला शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. यात मध्यावधी निवडणूक होणार नाही, चिंता करू नका, आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असं शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे चिंता करायची गरज नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत, याविषयीचा विश्वास शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे. मात्र सरकार कसं स्थापन केलं जाणार याविषयी पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत भाष्य केलेलं नाही.