मुंबई : कोरोना व्हायरस हे प्रकरण दिवसागणित फार गंभीर होत आहे. राज्यात आणखी एक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डोंबिवलीतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला ११ मार्च रोजी ऑस्टेलियाहून भारतात आली होती. भारतात आल्यानंतर तिच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यामुळे ती दवाखान्यात देखील गेली. तेव्हा ती डॉक्टरांकडे देखील गेली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरानाची लक्षणं असल्यामुळे डॉक्टरांनी तिला कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. पण तिने ही बाब लपवली अखेर मंगळवारी रात्री या महिलेचा मृत्यू झाला आहे. आता तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ही राज्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी धोक्याची घंटा आहे. 


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३०२ वर पोहचली. त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे.