बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : चलनात असलेल्या नोटांचे आकार वारंवार बदलत असल्याने नागरिकांना मनस्ताप होत असतो. याप्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आरबीआयला प्रश्न विचारले होते. नोटांचे आकार बदलण्यामागचे कारण स्पष्ट करण्यासाठी अवधी देण्यात आला होता. आता आरबीआयने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे.चलनातील नोटा  या 'वॉलेट फ्रेंडली' असाव्यात यासाठी नोटांचा आकार बदलला असून आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे त्यात बदल करून नोटांचा आकार लहान केल्याचे प्रतिज्ञापत्र आज उच्च न्यायालयात आरबीआयने दाखल केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने 500, 2000, आणि 100 च्या नोटांचा आकार बदलून लहान केला आहे वारंवार अश्या पद्धतीने नोटा बदलल्या तर अंध व्यक्तींना नोटा ओळखता येणार नाहीत. या याचिकेवर आरबीआयला नोटांचा आकार कमी का केला ? याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितले होते. यासंदर्भात आज प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. या प्रतिज्ञापत्रात आरबीआयने वॉलेट फ्रेंडली नोटा बनवल्या आहेत असं सांगत आंतरराष्ट्रीय स्तराप्रमाणे नोटांचा आकार असावा यासाठी नोटांचा आकार लहान करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले.



नोव्हेंबरमध्ये एप आणण्यात येणार असून त्यावरून नोटा ओळखता येतील असेही या प्रातिज्ञा पत्रात म्हटल आहे. मात्र एपवर अवलंबून राहता येणार नाही. तंत्रज्ञानावर विसंबून राहून समस्येचे निराकरण होणार नाही असे सांगत प्लान बी काय आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला. याबाबत आज पुढील सुनावणी होणार आहे.