मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीका केलेय. भारतीय जनता पक्षाने  निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय, असे म्हटलंय. भाजपने जे अस्त्र  वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झालंय, असे राज म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जे पेरलं तेच आता उगवलंय. खोटी माहिती पसरवण्यासाठी, लोकांची मनं कलुषित करण्यासाठी जे सोशल मीडिया नावाचं अस्त्र भाजपने वापरलं ते आता त्यांच्यावर बुमरँग झाल्याची टीका त्यांनी केली.


निवडणूका जिंकण्यासाठी वाट्टेल ती आश्वासनं दिली, लोकांची मनं भडकवण्यासाठी खोट्याचं खरं करून दाखवलं, आणि जे याला विरोध करत होते त्यांना 'ट्रोल्स' च्या माध्यमातून शिवीगाळ केली, त्यांचं खच्चीकरण केले, असे ते म्हणालेत.